रत्नागिरीचे प्रांतधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव आणि सुकन्या मनस्वी यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली यांच्या वतीने जाहीर सत्कार

रत्नागिरीचे प्रांतधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव आणि सुकन्या मनस्वी यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली यांच्या वतीने जाहीर सत्कार
चिपळूण (ओंकार रेळेकर)
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव जीवन देसाई इयत्ता ७ वी,सुकन्या मनस्वी जीवन देसाई इयत्ता ४ थी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल गुहागर तालुक्यातील सुयश कॉम्पुटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश गजानन साळवी यांनी रत्नागिरी येथे जावून अभिनव जीवन देसाई याचा शाल घालून पुष्पगुछ आणि भेट वस्तू देऊन जाहीर सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या तर संचालिका सौ. सावी संदेश साळवी यांनी मनस्वी जीवन देसाई हिचा शाल घालून पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन जाहीर सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी सौ. मयुरी जीवन देसाई यांनी संदेश गजानन साळवी, सौ. सावी संदेश साळवी यांचे स्वागत केले.






